भारती फाऊंडेशनच्या वतीने स्कूल एक्सलन्स प्रोग्राम अंतर्गत आसाममधील शिक्षकांना प्रशिक्षण

Photo Credit- Bharati Foundation, LinkedIn

आसाम ( जोरहाट ) : भारती फाऊंडेशन संस्थेने आसाम राज्य सरकारच्या सहकार्याने ८० मास्टर ट्रेनर्ससाठी स्कूल एक्सलन्स प्रोग्राम अंतर्गत विस्तृत प्रशिक्षण सुरू केले आहे जे जोरहाट, आसाममधील १३००+ सरकारी शाळांमधील ४००० हून अधिक शिक्षकांना पुढील प्रशिक्षण देतील.

या कार्यक्रमाद्वारे शिक्षक एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करून त्यांना समृद्ध शिक्षण अनुभव प्रदान करू शकतील. असे भारती फाऊंडेशन संस्थेने या कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे.

भारती फाऊंडेशनने २०२१ मध्ये सत्य भारती क्वालिटी सपोर्ट प्रोग्राम अॅट स्केल इनिशिएटिव्ह अंतर्गत प्रभावाची त्रिज्या विस्तृत करण्यासाठी आपला स्कूल एक्सलन्स प्रोग्राम सुरू केला. मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. जे मुलांसाठी एकूण शालेय अनुभव वाढवण्यासाठी शाळांच्या प्रमुखांना सक्षम करतील.

Exit mobile version