• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

चंद्रपूर जिल्ह्यात ‘हर घर जल’ विशेष मोहीम. २ ऑगस्टला विशेष ग्रामसभेचे आयोजन

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
305
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चंद्रपूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात दि. २५ ते १२ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर जल’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.चंद्रपूर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली.

डॉ.मित्ताली सेठी म्हणाल्या, जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत १०० टक्के वैयक्तीक व संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणा-या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबाना प्रति दिन प्रती व्यक्ती ५५ लिटर पिण्याचे शुध्द व शास्वत पाणी पुरवठा प्रदान करणे आहे.

या उपक्रमात विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत ‘हर घर जल’ घोषित करण्याचा ठराव करणे, त्यानंतर गावात समारंभ घेउन ‘हर घर जल’ उत्सव साजरा करणे, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे, जनजागृतीसाठी पथनाटयांचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करून जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी एफटीके कीटव्दारे पाणी नमुणे तपासणी विशेष मोहीम राबविणे, हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी घटकांना सहभागी करुन घेणे.

संस्थात्मक नळजोडणीमध्ये ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणी नळ जोडणी देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे गावचे सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था व लोककलावंत यांनी हर घर जल उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प.चंद्रपूर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

Previous Post

ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील वंचित विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि स्टेशनरी वाटप

Next Post

मिशन वात्सल्य योजनेची पनवेल तालुकास्तरीय समितीची बैठक तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Next Post

मिशन वात्सल्य योजनेची पनवेल तालुकास्तरीय समितीची बैठक तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version