• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, May 11, 2026
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, May 11, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home ब्लॉग

जय भीम प्रवर्तक बाबू हरदास जयंतीनिमित्त्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा

NGO ख़बर by NGO ख़बर
January 6, 2023
in ब्लॉग
491
0
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बाबू हरदास यांचा जन्म ६ जानेवारी १९०४ रोजी कामठी, नागपूर येथे झाला. पटवर्धन हायस्कूल मध्ये १० वी पर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह साहूबाई यांच्यासोबत झाला. पुढे सामाजिक चळवळीत ते सक्रिय झाले. बाबासाहेबांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता, लांबून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केले, तर मजुरांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून रात्र शाळा चालू केल्या.

विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदू पत्ते गोळा करत, बिडी कारखान्यांमध्ये काम करत तसेच घरोघरी बिडी वळण्याचे काम देखील चालत असे. बिडी कारखानदार आणि कंत्राटदार अशा लोकांची पिळवणूक करत असत. १९२५ साली बाबू हरदास यांनी ते लक्षात घेऊन त्यांच्या न्याय व हक्कासाठी बिडी कामगार संघटना उभी करून त्यांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून दिले. बिडी मजुरांच्या संघटनेचे काम केवळ विदर्भापुरतेच मर्यादित राहिले नाही. १९३० साली त्यांनी मध्यप्रदेश बिडी मजूर संघाची स्थापना केली.

बाबू हरदास हे एक उत्तम कवी व लेखक होते, १९३२ साली त्यांनी ‘महारठ्ठा’ नावाचे पत्रक काढले. त्याच साली झालेल्या ‘डिप्रेस्ड क्लास मिशनचं दुसरं अधिवेशन कामठी येथे झाले त्यात बाबू हरदास यांनी या अधिवेशनाचे स्वागत समितीचे अध्यक्षपद भूषविले, या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांनी अतिशय भव्य स्वागत केले. बाबासाहेबांच्या या भेटीनंतर त्यांच्यावर त्यांचा आणखीन प्रभाव झाला व चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी त्यांचा उत्साह अधिक कैक पटीने वाढला.

१९३७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ‘ स्वतंत्र मजूर पक्ष ‘ पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली, समोर धनाढ्य व्यक्ती, पाहिजे तितक्या पैशांचे आमिष, जिवे मारण्याची धमकी मिळून देखील त्यांनी उमेदवारी मागे नाही घेतली व ते म्हणाले “मी आंबेडकरांच्या पक्षातर्फे उभा आहे, आम्ही भीक मागणे केव्हाच सोडून दिले आहे. आता आमच्या हक्काचं आम्ही मिळवून राहू. व पुढे काय होईल ते पुढचे पुढे बघू.” विरोधकाकडे पैसा आणि ताकद असून देखील बाबू हरदास ही निवडणूक जिंकले आणि सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलवर गेले.

अतिशय कमी वेळात चळवळीसाठी प्रचंड मोठे कार्य करणाऱ्या जय भीम प्रवर्तक बाबू हरदास यांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन !

दस्तुरखुद्द ! संतोष आंभोरे

Share122SendTweet76Share21
Previous Post

Captain Rahul Bali Conferred “Goodwill Ambassador Award” for Empowering the Youth of J&K and Ladakh

Next Post

Green ITIs to Come up in Karnataka, Gujarat and Assam

Related Posts

Img 3436 2 1.jpg
ब्लॉग

“मुलींच्या पायातील रुढी परंपरेच्या बेड्या तोडण्यासाठी- किशोरी प्रशिक्षण एक आशेचा किरण”

February 23, 2025
ब्लॉग

बार्शीच्या बस स्थानकावरची ‘ती’ मनोरुग्ण महिला !

June 20, 2023
ब्लॉग

R.S.S. आणि मी..!

May 25, 2023
ब्लॉग

पाचशे जणांपर्यंत पोचले सावित्रीबाईंचे विचारकार्य

January 15, 2023
ब्लॉग

शोध सत्याचा, वेध गडकिल्ल्यांचा ! गडकिल्ले सत्यशोधक मोहीम !!

November 14, 2022
ब्लॉग

ब्लॉग : वृक्षवल्ली आम्हां सोयरे ..!

August 8, 2022
Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Go to mobile version