• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, May 11, 2026
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, May 11, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home ब्लॉग

प्रिय बाबासाहेब…

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्याचं बाबासाहेबांना पत्र

NGO ख़बर by NGO ख़बर
April 16, 2022
in ब्लॉग
496
0
प्रिय बाबासाहेब…
307
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रिय बाबासाहेब…

सप्रेम जय भीम, जय संविधान..!!

कसे आहात? काय चाललंय बाकी? आज पत्राच्या निमित्ताने तुमच्याशी बोलता येतंय. इतर वेळेस आपल्या भवतालच्या आणि जगभरातल्या घडामोडी बघायच्या आणि मनाच्या संवेदनशीलतेनुसार त्यावर व्यक्त व्हायचं एवढंच काम आतापर्यंत करत आलो. आता ज्या गोष्टी बघितल्या त्याच तुमच्यापर्यंत पोचवतोय.

आजही तुमच्या संघर्षाची बाराखडी गिरवणारे हजारो भीमराव मला समाजात दिसतायत. तुम्ही त्या काळी मंदिर प्रवेश, चवदार तळे सत्याग्रह आणि संविधाननिर्मितीच्या महत्त्वाच्या कामात योगदान दिलं नसतं तर तुम्हाला आपलं मानणाऱ्या समाजाचे आज काय हाल झाले असते त्याचा विचार करवत नाही. तुम्ही हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर तुम्हाला वाळीत टाकलेले लाखो लोक आपल्या देशात आहेत बरं का..!! तुमचा, तुमच्या अनुयायांनी स्वीकारलेल्या निळ्या झेंड्यांचा आणि जयभीम नाऱ्याचा ते गर्वाने धिक्कार करत असतात. असो, त्यांच्या मनातील द्वेषालाही पुरून उरेल अशी संविधानाची देण तुम्ही देशाला देऊन ठेवलीय याच आशेवर अनेक गोष्टी स्वीकारणं आजकाल सोपं जातंय.

अवहेलनांनी भरलेलं तुमचं आयुष्य पाहिलं की तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव होते. १२ आणि १८ तास अभ्यास या गोष्टी मोबाईलच्या नोटिफिकेशनची बीप वाजल्यानंतर न बघता करायच्या असतात याची जाणीवच आमच्या पिढीला आता नाही. शाळा-कॉलेजमध्ये शिकवलं जातंय तेवढं शिकायचं, गडगंज पगाराची नोकरी आणि सोज्वळ छोकरी बघून मोकळं व्हायचं हा इथल्या तरुणाईचा प्राधान्यक्रम झाला आहे. गरिबांसाठी लढणारा आंबेडकरवादी ही ओळख झोपडपट्टी आणि कष्टकरी वस्त्यांमध्ये ठळकपणे जाणवून येते.

बाबा, खरं सांगू – तुझ्या लोकांना आजही इथली सवर्ण लोकं तितक्या मोकळेपणाने स्वीकारत नाहीत रे..!! तो/ती आपल्यातला आहे का? हा ठरलेला प्रश्न ऐकायला मिळतोच. तुझी ओळख महामानव, दलित उद्धारक अशी करून देताना बाबासाहेब हे देशातल्या सगळ्यांचेच होते, आहेत हे सोयीस्कररित्या विसरलं जातं. राजकारणासाठीची व्होट बँक म्हणून मात्र तुझ्या नावाचे शिक्के लावलेले लोक आपोआपच पुढे येतात. अशोकचक्र किंवा निळा झेंडा दिसला की नाकं मुरडणारे अपल्यातलेच काही लोक पाहिलं की त्यांना माणूस म्हणायचीही लाज वाटते बग भीमा..!!

भारत हे जातीय अत्याचारांचं आगार बनायचं नसेल तर आज देशातील सगळ्याच राजकारण्यांना तुझ्या विचारांवर चालावं लागणार आहे. पण हे केलं तर राजकारण कसं करणार? या विचारानेच सगळा घोळ घातला आहे. जातीय आणि धार्मिक दंगली घडवणाऱ्या अनेक राजकारण्यांना, सरकारांना जाब विचारण्याची धमक तू निर्माण केलेल्या संविधानाने दिलीय बघ..!! निराशेचे मळभ कितीही दाटले तरी तुझा संघर्षाचा वारसा जपणारे लोकही अस्तित्वात आहेत बरं का..शाहिरी, लोककला, साहित्य माध्यमातून तू दिलेले विचार हे लोक तळमळीने इतर समाजापर्यंत पोचवतायत. काही लोक रस्त्यावरच्या लढाईतसुद्धा प्राणपणाने लढताना दिसतायत. तुझ्या प्रेरणेनेच करोडो नागरिकांची पहिली पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं पहायला मिळतंय. तुला प्रेरणास्त्रोत मानून देश-विदेशात शिक्षणासाठी जाणारी पिढीही आता उघड्या डोळ्यांनी पाहता येतीय. हा आनंद मोठाच आहे.

महात्मा गांधींना तू तुझ्या बुद्धीने आणि लढण्याच्या वृत्तीने थक्क केलं होतंस तर जवाहरलाल नेहरूंनाही देशाच्या नियमांची चौकट आखू शकेल असा शिल्पकार तुझ्यातच दिसत होता. माणसांना मापात ठेवता आलं पाहिजे, त्यांना डोक्यावर घेताना त्यांनी दिलेले विचार पायदळी तुडवले जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असं महापुरुषांच्या बाबतीत नेहमी सांगितलं जातं. हे समजायला मात्र अजून काही काळ जावा लागेल एवढं नक्की..!! सामाजिक समतेचा आणि बंधुतेचा विचार रुजण्यासाठी संविधानाच्या रुजवणुकीची सर्वांत जास्त गरज आज निर्माण झालीय. तुझे अनेक साथीदार हा लढा प्राणपणाने लढतायत. अविचारी शक्तींना विचाराने आणि कृतीने उत्तर देतायत.. याची प्रेरणा फक्त तूच आहेस भीमा..

जन्मभर पुरेल एवढी प्रेरणा दिल्याबद्दल तुझं उपकार विसरता न येणारंच आहेत..म्हणूनच लोकही म्हणतायत – “माय बापाहुन भिमाचं उपकार लय हाय रं, आम्ही खातू त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!!

थँक्स बाबा..!!

तुझाच
एक लेकरू

-योगेश नंदा 

Share123SendTweet77Share21
Previous Post

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहच्या निमित्ताने अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन

Next Post

शितल पाटील यांना ‘डॉ. आंबेडकर रत्न’ पुरस्कार

Related Posts

Img 3436 2 1.jpg
ब्लॉग

“मुलींच्या पायातील रुढी परंपरेच्या बेड्या तोडण्यासाठी- किशोरी प्रशिक्षण एक आशेचा किरण”

February 23, 2025
ब्लॉग

बार्शीच्या बस स्थानकावरची ‘ती’ मनोरुग्ण महिला !

June 20, 2023
ब्लॉग

R.S.S. आणि मी..!

May 25, 2023
ब्लॉग

पाचशे जणांपर्यंत पोचले सावित्रीबाईंचे विचारकार्य

January 15, 2023
ब्लॉग

जय भीम प्रवर्तक बाबू हरदास जयंतीनिमित्त्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा

January 6, 2023
ब्लॉग

शोध सत्याचा, वेध गडकिल्ल्यांचा ! गडकिल्ले सत्यशोधक मोहीम !!

November 14, 2022
Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Go to mobile version